दिल्लीला निघालेल्या खासगी बसला आग लागून पाच जणांचा दुर्दैवी अंत   

लखनऊ : उत्तरप्रदेशात लखनऊच्या कल्ली पश्चिममध्ये एका खासगी स्लीपर बसला भीषण आग लागली आहे. ही बस ६० प्रवांशाना घेऊन बिहारहून दिल्लीला निघाली होती. यामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांची समावेश आहे. ही बस बिहारहून दिल्लीला निघाली असता सकाळी ५ वाजता मोहनलालगंजजवळ बाह्य रिंग रोडवर जे किसान पथ म्हणून ओळखले जाते. येथे घडला. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत असल्याचे माहिती आहे.
 
प्रवाशांनी सांगितले , चालत्या बसमध्ये अचानक धुराचे लोट येऊ लागले, ज्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. काही मिनिटांतच आगीच्या जोरदार झळा बसू लागल्या. पण बस चालक आणि वाहक बस सोडून पळून गेले. चालकाच्या आसना जवळ एक अतिरिक्त सीट असल्याने प्रवाशांना खाली उतरण्यास अडथळा आला. ज्यामुळे घाईघाईत उतरताना प्रवासी अडकले आणि पडले. परिसरातील लोकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला ही माहिती दिली आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पीजीआय, मोहनलालगंज, सुशांत गोल्फ सिटी पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसीपी रजनीश वर्मा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने बचाव कार्याच्या धुरा सांभाळली. पोलिसांनी बसमधून मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले. डबल-डेकर बसमधील आग विझवण्यासाठी सहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, आग आटोक्यात आली आहे. पण बसमधील प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे.
 
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. अग्निशमन दल ३० मिनिटांत तेथे पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. बसच्या आतून पाच जळालेले मृतदेह बाहेर काढले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसले आहे की, बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला नाही, ज्यामुळे मागे बसलेले लोक अडकले होते. बसमध्ये प्रत्येकी पाच किलोचे सात गॅस सिलिंडर होते, परंतु एकाही सिलिंडरचा स्फोट झाला नाही.
 

Related Articles